Posts

Showing posts from 2022

बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग २

Image
याधीचे भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 भाग १  https://supriyaghude.blogspot.com/2022/12/blog-post.html बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग २ (क्रमशः) ट्रेन Booking केलं खरं परंतु नेहमीप्रमाणे निघायच्या आदल्या रात्रीपर्यंत ट्रिप कॅन्सल व्हायच्या मार्गावर होती. आमच्या प्रत्येक ट्रिप ला कोणती न कोणती आडकाठी असतेच 😖 काहीही कारणं निघू शकतात. जसं मागच्या सोलापूर ट्रिप ला आमची ट्रेन च कॅन्सल झाली होती 😔😓😟😞 राहण्याची व्यवस्था : बंगळुरू ला पोहोचल्यावर १ दिवस / रात्र तिथे स्टे करायचा आणि बाकी २ रात्री म्हैसूरू ला राहायचं ठरलं. Online booking करून ठेवणं गरजेचं होतं, तिथे जाऊन lodge शोधायला वेळ ही नसणार होता आमच्याकडे. परंतु अनोळखी ठिकाणी डायरेक्ट राहायला जायचं म्हटलं की तिथला एरिया कसा असेल याची काहीच कल्पना नसते आपल्याला. असो जे मिळेल lodge तो बघू, काही पर्याय नव्हता.   MakeMyTrip वरून काकांनी बंगळुरू मधील Hotel Sapphire च बुकिंग केलं.  आणि म्हैसूरू मधील Hotel Garden City ( https://www.google.com/travel/hotels/s/iLePV6VZ9NKpS4Aq7 ) च बुकिंग केलं. Google वर गा

बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग १

Image
  बंगळुरू म्हैसूरू प्रवासवर्णन १३ ते १८ डिसेंबर २०२२ : भाग १ ऑगस्ट २०२२ मधली सोलापूर ट्रिप यशस्वी झाल्यानंतर आम्हाला पुढच्या ट्रिप चे वेध लागले. खरं सांगायचं तर एक ट्रिप चालू असतानाच आम्ही पुढच्या ट्रिप च प्लांनिंग करायला सुरुवात करतो 😁 पुढची ट्रिप बंगळुरू करायची ठरवली. डिसेंबर महिना नक्की केला. यावेळी आपले काही सण नसतात त्यामुळे घरी काही कामं नसल्याने भटकायला बाहेर पडू शकतो 😃 सोलापूर ट्रिप ला जसे कुडाळ हुन च Ertiga घेऊन निघालो होतो तसच एखादी गाडी घेऊन निघायचं बंगळुरू ला असं ठरलं सुरुवातीला.  बंगळुरू ला जायचं म्हणजे ७ दिवसांची तरी ट्रिप होईलच अर्थात समान जास्त असणार. म्हणून मोठी गाडी करून निघायचं ठरवलं.  बंगळुरू जातोच आहोत तर म्हैसूरू सुद्धा बघून येऊ असं ठरलं. ऑक्टोबर मध्ये आमची trip प्लांनिंग ची पहिली बैठक झाली.  त्यात बंगळुरू-म्हैसूरू-चिकमंगळुरू-बदामी-हंपी या ठिकाणचे जवळपास ४०+ जागा बघायचा ठरल्या.  आणि ही सर्व ठिकाणं पाहायला ७ दिवस तर नक्कीच पुरणार नाहीत एवढं लक्षात आलं. मग आता काय करायचं ..  बंगळुरू-म्हैसूरू-चिकमंगळुरू-बदामी-हंपी ही ट्रिप आपण २ वेगवेगळ्या ट्रिप मध्ये divide करायचं

सोलापूर ट्रिप २०२२

Image
 सोलापूर ट्रिप २०२२ ~ प्रस्तावना ~ Lockdown च्या आधी म्हणजे मार्च २०१९ मध्ये आम्ही सोलापूर ला जाऊन आलो होतो. त्यावेळी काही धावत्या भेटी झाल्या होत्या त्या अश्या - अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट चा राजवाडा / शस्त्रागार, तुळजापूर मंदिर, नळदुर्ग, सिद्धरामेश्वर मंदिर आणि सोलापूर भुईकोट . उन्हाळा असल्याने तेव्हा नळदुर्ग चा नर-मादी धबधबा पाहता आला नव्हता. आणि सोलापूर च्या भुईकोटात आम्ही उशिरा पोहोचलो त्यामुळे बाहेरचं गार्डन बघून परतलो होतो. तेव्हा ज्या दिवशी आम्ही सोलापूर हुन परतलो त्यानंतर एका आठवड्यात पहिला lockdown लागला होता 😨 नंतर Lockdown चालू असताना वाटलं होतं हा corona कधीच संपणार नाही आणि आयुष्य असं घरात बसूनच वाया जातंय की काय 😂 तब्बल २-३ वर्षांनी पूर्ण lockdown उठला आणि आम्हाला वेध लागले पुढील फॅमिली ट्रिप चे 🤩 Lockdown नंतर पहिली कोणती ट्रिप करायची असा विचार चालूच होता. आमच्या आत्येला अचानक स्वामी समर्थांच्या भेटीचे वेध लागतात 😀 म्हटलं चला lockdown नंतर ची पहिली ट्रिप स्वामी समर्थांकडून च सुरू करू. अक्कलकोट ला गेलं की जवळच तुळजापूर ला जाऊन कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च

निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा - मिथ्य आणि सत्य

Image
 पुस्तक : निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा - मिथ्य आणि सत्य लेखिका : विभावरी बिडवे नागरिकत्व कायदा, 1955 हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे, ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटींची माहिती देण्यात आली आहे. या कायद्यात आतापर्यंत पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे - 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015. ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक-२०१६ ’ याद्वारे १९५५ सालाच्या कायद्यात दुरूस्ती केले गेली, ज्याद्वारे मुस्लिम देशांमधुन भारतात सीमा ओलांडून आलेल्यांना बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाणार नाही. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद असलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, ८ जानेवारी २०१९ रोजी लोकसभेत अखेर मंजूर झाले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले होते. धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल, असं भाजप